Thursday 27 September 2018

Nostalgic आठवणी

जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे खूप साऱ्या गोष्टी मागे पडल्याची जाणीव होऊ लागते. बालपणी केलेली मौजमजा ,उगीच च कुणाची तरी उडवलेली खिल्ली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यावेळी असलेल्या priorities उदाहरण द्यायचे तर साध्या कुणी आलेल्या पाहुण्यांनी दिलेली छोटीशी gift मग ती काही ही असो पण आपल्याला स्वतःला मिळाली याचा आनंदच काही और असे.

आता खूप सारे मुबलक मिळते पण का कोणास ठाऊक लहानपणी कधीतरी मिळणाऱ्या छोट्या श्या गोष्टीचे खूप अप्रूप वाटे.जुने परत कधीच येत नाही हा तर निर्सग  नियमच आहे. हळूहळू वय वाढले की हा सारा निरागस भाव नाहीसा होऊन घाण्याला जुंपलेल्या बैलाची अवस्था होते. कधी कुटुंब साठी कधी स्वतःच्या करिअर साठी आपण धावत राहतो. या धावण्यात इतकी दमछाक होते की आपल्यातील लहान मुलं कुठल्या कुठे पळून जाते अन् उरते ते फक्त यंत्रवत शरीर मन भावना बोथट झालेले असे.
खर तरं ही सारी जगरहाटीचं आहे. परंतु आपणच थोडे बदलावयास हवे. काम करावे पण इतकेही नको की स्वतःच्या गरजांचाच विसर पडले. कधीतरी आपल्या मधे लपलेल्या त्या छोट्या मुलाला जागे करावे अन् त्याला मनसोक्त बागडू द्यावे. बघा किती मनःशांती मिळते ती.

सारा पसारा सावरता सावरता
खूप दूर निघून आले
आताशा वाटे मज
व्हावे लहानगे
वेचाव्या चिंचा बोरे
करावी धमाल मस्ती
अगदी बालपणी सारखीचं
या साऱ्या कामाचा
 व्याप सारावा बाजूला
हुंदडावे मनसोक्त
मन मानेल तसे
करावा सोहळा या
चोरलेल्या क्षणांचा
अन् मिळवावा खरा
आत्मिक आनंद
या दुनियेत जगण्याचा
तरचं होईल खरं
या जीवनाचं सार्थक
मिळेलं अलौकिक असं
सुखं समाधान

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment