Saturday 29 September 2018

माणूस हा जसा  बुध्दिवादी प्राणी आहे. तसाच तो भूत भविष्य आणि वर्तमान या साऱ्या काळात गुरफटणाराही आहे.
तसे बघितले तर ह्या तीन काळांना भाषेच्या व्याकरणात अनन्यसाधारण महत्व आहे.
पण मनुष्याच्या बाबतीत मात्र थोडेसे भिन्न आहे.
भूतकाळ म्हणजे घडून गेलेला काळ जो कधीच परत येत नसतो. तरीही मनुष्य त्यातच रमतो अन् जर गतकाळात काही वाईट घडले असेल तर तेच तेच आठवून कुढत बसतो.
भविष्यकाळ म्हणजे येणाऱ्या क्षणांची चाहुल खरं तर तशी ती थोडी फार प्रत्येकालाच होत असते काही जण त्या कडे डोळसपणे पाहतात तर काही जण नजरअंदाज करतात.
वर्तमान काळ म्हणजे सध्याचा चालू काळ.
आजकाल लोकं वर्तमानात जगण्यापेक्षा उद्याचीच चिंता जास्त करतात. भविष्यात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. अशाच अट्टाहासापायी काही लोक मग बुवा बाबा यांच्या मागे लागतात. प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीची तिची अशी एक वेळ असते त्याच वेळेस ती घडत असते तरीही नियती निर्सग यांना डावलून आधीच जाणून घेण्याच्या हट्टामुळे मनुष्य आजचा बहुमूल्य क्षण जगू शकत नाही.
हि फार मोठी शोकांतिका आहे की मनुष्याने एवढी प्रगती केली आहे की तो चंद्रावर जाऊन पोहोचला परंतु पंचमहाभूतांवर तो विजय नाही मिळवू शकत .त्यामुळे च आपण हे मान्य च केले पाहिजे की आपण आपले कर्म करत रहावे भविष्याची काळजी न करता अन् भूतकाळाचं ओझं न बाळगता.

आयुष्य आहे मर्यादित
म्हणून रडण्यापेक्षा
आजचा क्षण जगा
भूतभविष्याची सोडा चिंता
भूतकाळातील आठवणींच्या
हिंदोळ्यावर  होऊ नका स्वार
भविष्याच्या चिंतेने होऊ नका
हवालदिल
वर्तमानातील सुखाचे क्षण
शिका टिपायला
कधी सुखात तर
कधी दुःखात
आयुष्य भरभरून जगत रहा
तुमच्या अस्तित्वाने
माहोल करा प्रफुल्लित
 बघा आयुष्याकडे
सुंदरेतेच्या काचांनी
अन् मिळवा समाधान
या साऱ्या मौलिक क्षण जगण्याचे

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment