Wednesday 26 September 2018

नातं


आजकाल पेपर बघितला की मनावर एका मागून एक आघात होतात. कुठे कुणी कुणावर बलात्कार केला कुठे इस्टेट मिळवण्यासाठी भावानेच भावाचा काटा काढला घटस्पोटाची एक तरी घटना असतेच. किती भयंकर आहे हे अमानवी अमानुष असे. खरचं आपली एवढी नीतीमूल्ये बदलली आहेत की चांगल्या वाईटातला फरकच दिसत नाही. आपल्या भावना एवढ्या बोथट झाल्या आहेत की बऱ्या वाईटाची चाडच राहिली नाही. ज्या समाजात आपण राहतो त्या चे काही तरी ऋण आपल्यावर आहेत हेच आपण सोयीस्कर पणे विसरलो आहोत का?

खर तरं नातं हा दोन अक्षरीच शब्द परंतु खूप मोठा अर्थ दडला आहे त्यात. कुठल्याही दोन व्यक्ती चं नातं जुळण्यासाठी रक्ताची गरज नसते तर विचार आचार जुळण्याची जास्त गरज असते.नातं मग ते नवरा बायको चं असू दे नाही तर सासू सुनेचं नणंद भावजयीचं असू दे. ते जुळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो निर्सग चा नियमच आहे कुठलीही गोष्ट आपसूक एका सेंकदात तयार होतं नाही तसचं नात्याचं असतं.
आपण जेव्हा नवीन झाडं लावतो तेव्हा त्याला त्या नव्या कुंडीतल्या मातीत रूजण्यासाठी थोडे दिवस जाऊ देतोच ना फक्त पाणी घालत राहतो की जेणेकरुन त्याने या नव्या हवेत नव्या वातावरणात घट्ट मुळे रोवावीत म्हणून. नात्याचं ही असचं असतं हळुवार अलगद असं ते उलगडत जातं मग आपसूकच त्याची घट्ट वीण होते.
पण या साऱ्या process ला जो वेळ द्यावा लागतो ना तोच आजकाल नाहीसा  झाला आहे. Ready to eat च्या या जमान्यात
सगळं लगेचच हवे आहे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ अन् patience मुळी लुप्त पावत चालला आहे. याचेच पर्यवसान मग नाती नाहीशी होण्यात होत आहे.
मला वाटते नवी पिढी खरं तर खूप हुशार आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. नाही आहे तो patience तो जर त्यांनी आत्मसात केला तर त्यांना नाती जपा असे सल्लेच द्यावे लागणार नाहीत.

नातं कुठलही असो
रक्ताचं वा मैत्रीचं
ते तेव्हाचं बहरतं
जेव्हा त्याला समजुतीचं
कोंदण मिळतं
नात्याचा पोतं असा असावा
की जोअलवार उलगडला
तर घबाडं गवसावं
नातं असं असावं
अगदी घट्ट वीणीने गुंफलेलं
नात्यात नसावा मीपणाचा
अहंकार
असावा फक्त आपलेपणाचा
आश्वासक हुंकार
म्हणूनच म्हणते
शिका नाती जोडायला
 ती निभावायला
करा प्रयत्नांची पराकाष्ठा
अन् करा सोहळा
नात्यांच्या जडणघडणीचा

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment