Friday 12 October 2018

आज पहाटे फिरायला बाहेर पडले. सर्वत्र धुक्याची चादर पसरल्यासारखी वाटत होती.रस्ता अगदीच धुसर दिसत होता.त्या धुक्याने एक छान गोष्ट शिकवली समोरचा रस्ता दिसत नसेल तर जसे जसे पुढे जाल तसं तसा रस्ता  दिसू लागतो जीवनाचं असचं असतं रस्ता सापडत नसेल तर दूरदृष्टीने प्रयत्न करणं व्यर्थ असते हळूहळू पाऊल टाकत पुढे सरकत जाल तर रस्ता आपोआप मोकळा होत जाऊन आपसूक मार्ग सापडतो.किती मोठे तत्वज्ञान ! नेहमी आपण धुक्याने दिसत नाही म्हणून अडून राहतो त्याच धुक्याला खूपच दूषण देत राहतो परंतु निसर्गातील प्रत्येक बदल माणसाला नवनवीन जीवनाचे पैलू दाखवत असतो. फक्त आपण त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज असते.

शुभ्र धुक्याने मज
पुरतेच वेढले
डोळस असून मज
चाचपडावयास लावले
मंद गती करुन मज
सामोऱ्या रस्त्याचे ज्ञान झाले
धुक्याने मज
जीवनाचे गणित शिकवले
कितीही असू दे मार्ग धुसर
 दुडक्या गतीने टाक पाऊल
मगच होईल रस्ता मोकळा
गवसेल तुस,
 तुजा असा मार्ग वेगळा
तुजा असा मार्ग वेगळा

मृणाल वाळिंबे

Friday 5 October 2018

सध्याच्या गतिमान जगात तसे तर कुणालाच कुणाकडे बघायला वेळ नाही. प्रत्येक जण इतका busy असतो की झोपेतून उठून रात्री झोपस्तवर काय कामं करायची याची एक यादी डोक्यात घोळत असते. त्यामुळे अचानक कोणी तरी कसलेतरी आमंत्रण किंवा इतर काही काम सांगितले की मनुष्य गोंधळात पडतो आणि त्याची चिडचिड सुरू होते. त्या वैतागातूनच एक statement बाहेर येऊ लागते मला वेळचं नाही मी किती busy आहे मला माझाच विचार करायला वेळ नाही वगैरे वगैरे.. आमची आजी लहानपणी म्हणायची "अग बायांनो दिवस कधी मोठा होत नसतो आपणच पहाटे उठावं म्हणजे सगळं बेस होत असतं" आजकाल हे आजीचे शब्द सारखेच कानात घुमतात खर तरं आमची आजी आजकालच्या पिढीच्या दृष्टीने बघितलं तर एक गावंढळ अडाणी बाई पण केवढं अचाट जीवनाचं तत्वज्ञान सांगायची.
हे खरचं आहे दिवसाचे तास वाढत नाहीत कधी. त्यामुळे आपलं schedule दिवसात कसं बसवायचं ते आपणचं ठरवलं पाहिजे.
मला वेळ नाही ही सबब सोडून दिली पाहिजे. इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे मला वेळ कसा काढता येईल याचा विचार केला पाहिजे.
काम हे प्रत्येकाला असलेच पाहिजे नाही तर  त्याची परिस्थिती एखाद्या खटारा गाडीसारखी होईल नुसताच ढाचा बिनकामाचा.  काम करत रहाणे हे जिंवतपणाचे लक्षण आहे. हाताला काम हवे च नाहीतर इंग्रजी तल्या empty mind devil's workshop या म्हणीप्रमाणे परिस्थिती होईल.
काम कराच फक्त त्याबरोबरच आपल्या प्रियजनांनाही थोडासा वेळ द्या.कधीतरी एखाद्या रम्य ठिकाणी फिरायला जा बघा कशा तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात ते अन् मग परत कामाला लागा नव्या जोमाने नव्या जोशाने. तेच तेच काम करून monotonous होण्यापेक्षा कामातून थोडासा वेळ काढून स्वतः चे छंद जोपासा जे ठरेल तुमचे खरेखुरे टॉनिक.
सर्वात महत्त्वाचे आयुष्य खूप सुंदर आहे. काम करणाऱ्या व्यक्ती ला कधीच depression येत नाही म्हणून नेहमी कामात रहा. तुमच्यातल्या creative माणसाला सदैव जागे ठेवा म्हणजे तिच ठरेल तुमची खरी ओळख.
हसत रहा. दुनियेला हसवत रहा. पृथ्वीवर मनुष्य प्राणी म्हणून जन्मला आहात याचा अभिमानच बाळगा. अन् देवाचे आभार माना की त्याने एवढ्या creativity ने मनुष्यास जन्माला घातले.

मृणाल वाळिंबे
कधी कधी हे वेडं मन
काठोकाठं  भरून वाहतं
सुखदु:खाच्या अनुभवांची
आठवण साठवत रहातं
जुन्या क्षणांच्या हिंदोळ्यावर
झुलतचं रहातं
असं हे मनचं कधीतरी
मोकळं करावसं वाटतं
अन्  मगच आठवतं
एक संस्थान  मैत्री नावाचं
जिथे राग लोभ क्षणात
होतो  मोकळा
साठलेल्या दु:खाचा
जिथे होतो निचरा
मनातल्या अलवार भावनांचा
इथेच फुटतो बांध
असचं असतं हे
मैत्री चं झाड
अनामिक ओढीच्या
फांद्यांनी डवरलेलं
असं हे मैत्री चं झाड
प्रत्येकाने लावावं
जिवापलीकडे जपावं
अन्
नात्यापलीकडचं हे नातं
अलवार मनात रुजवावं

मृणाल वाळिंबे




काल whatsapp वर एक पोस्ट वाचनात आली नवरा IT engineer. व  बायको               CA असे दाम्पत्य नवरा अचानक कार accident मधे जातो पण त्याची सारी investment ही एका laptop मधे  गुप्त असते इतकी त्या बायकोला काहीच माहीत नसते. तात्पर्य इतकेच की साऱ्या जुन्या जाणत्या पिढीने याचा सारा दोष हा नवीन technology ला म्हणजेच Internet and online याला देऊन टाकला पण खरं तर हा दोष system चा नसून माणसाच्या       विश्वास र्हतेचा आहे. यावरुनच ही कविता
सुचली

मी तला मी कधी संपतच नाही
मी माझे मला याखेरीज
काही दुसरे सुचतच नाही
मी इतका आत्मकेंद्रित की
आजुबाजूचा समाज
जिवाभावाची माणसे मला
आताशा उमगतच नाहीत
झोपेतून उठून रात्री झोपे पर्यंत
एखाद्या यंत्रवत काम करतो मी
कशासाठी
ऐहिक सुख अन् खूप सारा पैसा
कमविण्यासाठी
अशा मृगजळापाठी धावतो मी
कुणाशी काही share करण्या इतका
वेळच नाही माझ्या शी
अन् मग स्वतःचा ego कुरवाळत
इतरांना तुच्छ लेखत virtual दुनियेत
हरवतो मी
पण अरे वे ड्या अजूनही जागा हो
जिवाभावाच्या माणसांत रम
थोडा पैसा कमी मिळू दे
पण तुझ्या जिवाभावाच्या माणसांच
बक्कळ प्रेम अन् विश्वास मिळव
तिच असेल तुझ्या आयुष्याची खरी पुंजी

मृणाल वाळिंबे

Thursday 4 October 2018

मैत्री

आजतागायत मैत्री या विषयावर खूप लेख वाचले. खूप मैत्रीचे किस्सेही ऐकलेत. म्हणूनच वाटले आपणही मैत्री वर चार ओळी लिहाव्यात. खरं तर मैत्री या शब्दातच खूप सामर्थ्य आहे. दोन माणसांची मैत्री ही स्थळ काळ वेळ किंवा लहान मोठं हे बघून होतच नसते ती होते ती फक्त आणि फक्त त्यांच्यातील एखाद्या समान छंदामुळे, स्वभावातील साम्याने किंवा काही वेळा तर आयुष्यात खालेल्या खस्तांनी सुध्दा.
असो आज मला एक प्रसंग आठवतो आहे याच मैत्रीला धरुनच आहे. तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मध्यमवयीन साऱ्या लोकांना new generation मुळे facebook आणि whatsapp चे आकलन झाले होते. तेव्हाच पुण्यातील एका मित्राला facebook वर आपले जुने दोन मित्र सापडले. मग दोन सापडल्या वर त्याच्या group मधील बाकी साऱ्या मित्र मैत्रिणींना तो शोधू लागला.जवळ पास सारे सापडले एक मैत्रीण सोडून त्याला खूपच रुखरुख लागली. परंतु तो हटला नाही त्याने या साऱ्याचा एक whatsapp group करुन पूर्वीसारखे वैशाली त भेटायचा प्रस्ताव ठेवला. आता सारेच आयुष्यात स्थिरावल्यामुळे आणि खूप वर्षांनी भेटण्याची उत्कंठा असल्यामुळे सगळे तयार झाले. भेटले त्या दिवशी सर्वांना आपल्या न सापडलेल्या मैत्रिणीची खूप आठवण येत होती. परंतु शाळा सोडल्यापासून ती कोणाच्याच संर्पकात नसल्यामुळे कोणाला तिचे काही च माहीत नव्हते कारण तिचे लग्न झाले असेल नाव बदले असेल तर facebook वर कसे सापडणार. पण जिथे इच्छा जबर असते ना तिथे मार्ग आपसूक सापडतोच. तसेच काही से झाले त्या groupमधील एका मैत्रिणीला कळले की ती पुण्यात च आहे परंतु आजारी आहे. तिला राहवेच ना तिने पत्ता शोधला अन् थेट तिच्या घरीच पोहोचली. तिचा विश्वास च बसेना शाळेत सगळ्या games मधे हिरीरीने पुढे असणाऱ्या आपल्या मैत्रिणी ला असे अंथरुणाला खिळलेले पाहून. नंतर चौकशी अंती कळले की तिचा accident झाला वर्षभरापूर्वी तेव्हापासून ती अशीच आहे. तिने ठरविले आपल्या मैत्रिणीला आपणच साऱ्या मित्र मैत्रिणींनी मिळून बरे करायचे. तिने साऱ्यांना बोलावून सर्व बघितलेले कथन केले आणि म्हणाली आता आपली मैत्रीण परत पूर्वी सारखी आपल्यात आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला प्रयत्न करून बघूया. आणि रोज एक एक जण जाऊन तिच्याशी तासभर गप्पा मारु लागले हळूहळू ती बरी होऊ लागली. आणि एक दिवस तिच्या मुलाने फोन केला त्या मैत्रिणी ला म्हणाला मावशी आज आई स्वतः होऊन उठून चालू लागली आणि तिने तुम्हा सगळ्यांना घरी बोलावले आहे.
त्याचे शब्द ऐकून त्या मैत्रिणीचा आनंद गगनात मावेना.तिने पटापटा सगळ्यांना फोन केले. सर्वच खूप आनंदाने तिच्याकडे गेले सगळ्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते आपली मैत्रिण माणसात आली याचा कोण आनंद झाला होता सर्वांना. डॉ क्टर सुध्दा म्हणाले हे काही तरी अर्तक्यचं आहे.खरं तर ही सारी जादू मैत्रीची होती.हीच ताकद आहे खऱ्या निखळ स्वच्छ सुंदर मैत्रीची.

मैत्री एक अनोखं बंधन
जिथे नसतो स्वार्थाचा गंध
असतो तो फक्त अतूट संग
मैत्री एक अतूट नातं
जे तप्त उन्हातही असतं
सावलीसमं
वसंतातल्या गुलमोहरासमं
अलवार फुलणारं
अन् सहवासाच्या चांदण्यात
मनमुराद खुलणारं
मैत्री एक अभेद्य साथं
सदैव मदतीचा हात देणारी
अन् संकटांना सोबतीनं
मात देणारी
मैत्री एक असं घरटं
जिथे मिळे वणव्यातही सहारा
अन् दुर्देवातही थारा
मैत्री एक असं औषध
जे डॉ क्टरांशिवाय मिळतं
अन् जे मनाची कायम किळजी घेतं
मैत्रीसारखी दुसरी देणगी नाही
मनाच्या अलगद कोपऱ्यातील

गुपित उघड करायला
मैत्रीखेरीज दुसरं  हक्काचं स्थानचं नाही
म्हणून च म्हणते
मैत्री एक अनमोल ठेवा
हृदयातून जपण्यासारखा
अन् अंतापर्यंत साथ निभावण्यासारखा

  मृणाल वाळिंबे

Wednesday 3 October 2018

आई आणि मुलगी किती अलौकिक असे नाते. पृथ्वीतलावर जी काही श्रेष्ठ नाती आहेत त्यापैकीच हे एक आहे. प्रत्येक आई आपुलीच छबी आपल्या मुलीमध्ये बघत असते.
आई मुलीचं नातं हे खूप पारदर्शी हळुवार अन् तरल असचं असतं. आई अन् मुलगी यांच्यात एक आश्वासक असा बंध असतो. आईला नेहमीच आपली मुलगी आपल्या पेक्षा सरस व्हावी असेच वाटत असते. त्यामुळे प्रसंगी दटावणारी आईच काही वेळाने तितकीच प्रेमाने मायेने जेव्हा जवळ घेते तेव्हा आपल्याला आभाळं ठेंगण होत.
खर तरं या जगात आई या नात्यासारखं दुसरं नातचं नाही . तिच्या साध्या असण्याने च केवढा आत्मविश्वास प्राप्त होतो. आईला आपली सारीचं पिले सारखी असतात. परंतु जर मुलगी असली तर ती तिच्याकडे जास्त ओढली जाते.
वास्तविक ती स्वतःच्या मुलीकडूनच स्वतःच्या अतृप्त इच्छा आकांक्षा पूर्णत्वाला नेण्याची मनिषा बाळगून असते.दाखल्या दाखल हेच बघा ना बऱ्यादा मुलीला भरतनाट्यम् मध्ये interestनसतो परंतु तिच्या आईला नाचच शिकता आलेला नसतो मग मघा म्हणल्याप्रमाणेच ती आपली ही सुप्त इच्छा मुलीद्वारे पूर्ण करते.
आई मुलीच्या नात्यातला आणि एक पैलू म्हणजे दोघींची एकमेकांना समजू उमजू घेण्याची शक्ती. बरचेदा आई आणि मुलगी यांना न बोलताच एकमेकींच्या मनातलं कळतं अगदी मनकवड्या असल्यासारखं.
असं म्हणतात की आई अन् मुलाची नाळ जोडलेली असते त्यामुळे त्यांना विलग करणे तितके सोपे नसते. म्हणून च जरी मुलीचे लग्न लावून तिला परक्या घरी धाडले तरी ती आपल्या आईला नाही च विसरु शकत. सतत प्रत्येक प्रसंगात तिला आईने काय केले असते हेच आठवत असते म्हणजेच indirectly तिच्या आईचेच संस्कार तिच्याकडून काम करवून घेत असतात.
असं हे आई लेकीचं नातं प्रत्येकीने आपपल्या परीने निभावावं अलगद हळुवारपणे कुठेही राग अन् व्देषाचं गालबोट न लावता.
प्रत्येक मुलीने सुध्दा आपण एक स्त्री आहोत याचा अभिमान बाळगताना आपल्या जन्मदात्या आईला विसरु नये.
या जगात आपण येण्यास आपले जन्मदातेच कारणीभूत आहेत त्यामुळे आपण त्यांच्या या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही म्हणून च त्यांचा जमेल तितका आदरच आपण केला पाहिजे हे विसरून चालणार नाही.

मृणाल वाळिंबे

Tuesday 2 October 2018

आजकाल रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा काही आजी आजोबा काही मध्यम वयीन बायका बंगल्यातून बाहेर डोकावणाऱ्या फांद्यांची फुले तोडत असतात. हे बघून खूप वाईटच वाटते म्हणजे ते फुले तोडतात म्हणून नाही तर ती एक मानसिकता आहे दुसऱ्याचे ओरबाडायचे. अन् मग हीच फुले आपल्या घरच्या देवाला वाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळवायचे. कसली हीन भावना  आहे ही . देवाला च फुले वाहायची असतील तर फुल पुडा विकत आणा तसेही हाँटेलात जाऊन जेवता तेव्हा खर्च करताच ना मग ज्या देवानेच हे सारे दिले त्यासाठी थोडा खर्च करा कुठे बिघडणार  आहे . पण नाही आम्हाला सवय च लागली आहे दुसऱ्याच्या वस्तूंवर डल्ला मारायचा.
यावरून च लहानपणी ची एक घटना आठवली. मी त्यावेळी आजीकडे राहायला गेले होते. आजीच्या बंगल्याला एक  बाग होती त्यात आजोबांनी खूप सारी फुलझाडे फळझाडे लावली होती. अन् माळी न ठेवता ते स्वतः च त्या बागेची मशागत करत त्यांना पाणी घालण्यापासून ते खत घालणे, औषधांची फवारणी करणे म्हणजे कीड लागू नये म्हणून हे सर्व ते एकटे करत असत.एवढे सगळे करण्यामुळे च सगळ्या झाडांना खूप छान टपोरी फुले येत असत अन् फळांचे तर काय अवीट गोडी असे त्यांना. यात मजा अशी होती की आजोबा या झाडांचे इतके प्रेमाने करायचे की त्यांना अशी बहरलेली बाग बघितली की कोण आनंद व्हायचा. स्वाभाविक च आहे ना ते बागेसाठी इतके झटायचे बागेतल्या झाडांना मुलाप्रमाणे जपायचे. असो ते दिवस आता परत येणार नाहीत. पण काही घटना मात्र हृदया वर कोरल्या जातात ना तशीच ही अगदी कालच घडल्यासारखी डोळ्यासमोर येत रहाते. त्या दिवशी अशाच एक आजी सकाळी सकाळी जुईची फुले त्या वेलीवरून पटापटा तोडत होत्या त्यात कोणी बघितले तर काय ही भिती असल्यामुळे त्या चक्क फुले भसाभसा ओरबाडून आपल्या साडीच्या ओच्यात लपवत होत्या इतक्यात आजोबांना चाहुल लागल्याने ते बाहेर आले तशा लगबगीने आजी सटकू लागल्या तसे आधीच रागाचा पारा चढलेले आजोबा जोरात ओरडले अहो या वयात कसली झाडांची फुले ओरबाडता? त्यावर आजींचे विचार फारच मौलिक होते त्या म्हणाल्या एवढी सारी बाग बहरली आहे कुठे चार फुले घेतली तर बिघडले आणि म्हणाल्या तशीही ही वेल बागेतून बाहेर रस्त्यावर च आली आहे त्याचीच फुले घेतली रस्त्यावर आल्यामुळे ती सार्वजनिक च झाली ना! आता काय बोलणार या वक्तव्यावर. आजोबा हटले नाहीत ते म्हणाले तुम्ही फुले घेतली त पण तुम्हाला माहित आहे का की या बागेतील झाडांना मी प्राणापलिकडे जपतो त्यांची निगा राखतो आणि अशा माझ्या या बछड्यांना तुम्ही धसमुसळेपणाने ओरबाडता तुम्हाला काही वाटत नसेलही पण एक सांगतो की झाडे काही निर्जीव नसतात त्यांनाही मायेचा प्रेमाचा स्पर्श कळतो त्यामुळे इथून पुढे असे निर्दयी पणे वागू नका. कृपा करा. तुम्हाला जर देवासाठी फुले हवी असतील तर मला सांगा मी काढून ठेवत जाईन पण माझ्या या  झाडांना असे डिवचू नका.
आज सकाळी फुले तोडणाऱ्या आजींना पाहून सारखे हेच आजोबांचे शब्द कानात घुमत होते.
खरचं जी माणसे इतकी मनापासून झाडांची अगदी श्रध्देने देवासमं सेवा करतात त्यांच्याच बागा अशा डवरलेल्या असतात मग अशा लोकांना आपण तरी का असे फुले पाने तोडून डिवचावे  बघा करा विचार. ज्या बागेसाठी आपण काहीच करत नाही त्यातील फुलापानांवर आपला
खरचं अधिकार आहे का? विचारा तुमच्या अंर्तमनाला अन् मगच कृती करा.

एक बाग फुलापानांनी डवरलेली
पारिजातकाचा सडा ल्यायलेली
निशिगंधाचा सुवास दरवळणारी
गुलाबाच्या ताटव्यांनी बहरलेली
जाई जुईच्या कमानीने
घराचे प्रवेशद्वार सुशोभित करणारी
अचानक यावे वादळ
अन् क्षणार्धात व्हावे सारे नष्ट
असेचं काहीसे होई
जेंव्हा लोक ओरबाडती
फुले पाने
अरेरे त्यांना जीव आहे रे
त्यांना खुडा हळूच
अलगद अलवार असे
असतील जरी मूक
तरी आहेत तेही भावना मय
नका  देऊ रे त्यांना
अशा यातना
नका  देऊ रे त्यांना
अशा यातना

मृणाल वाळिंबे

Monday 1 October 2018

Short memory



आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस इतका बिझी झाला आहे की त्यास स्वतः कडे लक्ष देण्यास वेळच नाही मग तो इतरत्र काय बघणार?
आज सकाळी morning walk ला एक जुनी शाळेतील मैत्रीण भेटली. अर्थातच खूप वर्षांनी भेटल्यामुळे आम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत होतो जसं पु . ल म्हणतात दोन मुंग्या दोन बायका अन् दोन ट्रक ड्रायव्हर एकमेकांना भेटले की काहीतरी बडबड केल्याशिवाय पुढे जातच नाहीत अगदी तसेच. आजूबाजूनी morning walk ला जाणारे येणारे आमच्या कडे हर तऱ्हेच्या नजरेने कुणी आसूयेने कुणी विस्मयाने असे बघत होते पण आम्ही आमच्याच बालपणीच्या विश्वात रमलो होतो. इतक्या त घड्याळ्याकडे लक्ष गेले अन् फारच उशीर होत असल्याचा संदेश मेंदू देऊ लागला मग गप्पा आवरत्या घेऊन परत एकमेकींना भेटण्याचे ठरवून आम्ही निघालो अन् लक्षात आले आपण एकमेकींचे फोन नंबर च घेतले नाहीत मग पुन्हा हाक मारुन फोन नंबर  exchange चा सोहळा पार पडला. मी असे म्हटले कारण दोघीही आपपले नंबर मोबाईल मधे बघूनच एकमेकींना देत होतो.
किती ही memory ची दुरावस्था. Technology प्रगत झाली पण आमची आठवण्याची कला मात्र अप्रगत झाली. त्यातूनच password ची लिस्ट करा स्वतःचे मोबाईल नंबर बँकेचे अकांऊट नंबर  एकत्र लिहून ठेवा यासारख्या साऱ्या गोष्टी चालू झाल्या.
या सर्वांचे उत्तर मात्र एकच खूप सारी व्यवधाने आहेत वेळच अपुरा पडतो काय काय लक्षात ठेवणार. पण तुमच्या एक लक्षात येत नाही की आपली मागची पिढी सुध्दा खूप काम करायची त्यांच्या वेळेला तर कुठलीही electronic gadgets उपलब्ध नव्हती आता जशी ती "क्या हुकूम है आका" म्हणत २४तास तुमच्या दिमतीला असतात तशी. त्यांच्या कडे एवढे गाडी घोडेही नव्हते की कुठल्याही कामासाठी त्यांना पायपीट च करावी लागायची वेळही जास्त लागायचा पण तरीही त्यांची memory शाबूत रहायची.
आता आपण technology चे गुलाम झालो आहोत त्यामुळे काही अडले की google आलेच मदतीला धावून थोडाही स्मरणशक्ती ला ताण द्यायला आपल्याला जमत नाही.
अरे वेड्यांनो , साधी लोखंडी कढई खूप दिवस वापरली नाही की त्यावर गंज चढतो आपले आता तेच होऊ लागले आहे विचार करायची आठवण्याची शक्ती लोप पावत चालली आहे. आपण वेळ नाही घाई आहे कुठे बुद्धिला ताण द्या म्हणून हा जो सोयीचा अन् आळशी पणाचा मार्ग जोपासत आहोत ना तोच आपला घात करतो आहे. त्यामुळे वेळीच जागे व्हा technology चा वापर करा पण जिथे गरज आहे तिथेच नाही तर एक दिवस स्वतःचे नाव सांगण्यासाठी सुध्दा मोबाईल बघायला लागायची वेळ येईल आपल्यावर.

माणूस आठवणींचा भुकेला
 प्रेमासाठी आसुसलेला
माणूस नवनवीन गोष्टींना
झटक्यात आत्मसात करणारा
माणूस असा प्राणी ज्याला
आहे मन
ज्याला आहेत भावना
ज्याला आहे मेंदू
जुनं साठविण्यासाठी
अन् नवं शिकण्यासाठी
मेंदूचं तर आहे जो
टिकवतोय खरं त्याचं अस्तित्व
जगवतोय मनुष्याला
त्याच्या मनासमं
अन् तोच तर ठरवतोय
त्याचं वेगळेपणं
म्हणूनच म्हणते
स्वतःला न विसरण्यासाठी
थोडी तरी द्या  बुध्दिला चालना
औट घटकेसाठी तरी
तरच वाचवू शकाल स्वतःला
Short memory च्या या विळख्यातून

मृणाल वाळिंबे