Thursday 27 September 2018

गणेशोत्सव

गणेशोत्सव २ दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी चालू झाली आहे. कोणी घरातच मखर बनवत आहेत तर कोणी विकतच्या मखरांची दुकाने पालथी घालत आहे.
खर तरं आमच्या लहानपणी अशी परिस्थिती नव्हती एवढ्या गणपती सजावटीच्या वस्तूचं नव्हत्या पण सण म्हणून दुसऱ्या गावाला असणारे काका काकू आत्या या साऱ्यांची मात्र रेलचेल असायची. काकू आत्या यांच्या हातच्या नवीन पर्दाथांची लज्जत काही     औरच असायची. तेव्हा वाटायचं हा गणपती सोहळा संपूच नये. छान बोधप्रत असे गणपतीचे देखावे अन् घरचे रोजचे गोडाधोडाचे जेवण यात दहा दिवस कसे संपायचे ते कळायचेच नाही.
लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव त्या वेळच्या इंग्रजी राजवटीला शह देण्यासाठी आपल्या लोकांनी एकत्र यावे अन् समाज प्रबोधन व्हावे यासाठी चालू केला. परंतु हळूहळू त्याला बाजारीकरणाचे स्वरूप येऊन त्याचा विचका झाला. आता तर त्या डीजे च्या वर काही तरी गाणी लावून नाचणे असेच त्याचे स्वरुप झाले आहे.
जर लोकमान्य टिळक स्वर्गातून बघत असतील तर त्यांना खूपच वाईट वाटत असेलं आणि खुद्द गणपती बाप्पा तर आता दहा दिवसाचा वनवास पृथ्वीवर भोगून येतो असेच सांगत असेल पार्वती मातेला.

झुंजूमंजू झाले
कोंबडा आरवला
अन् प्रभाती जाग आली
आळस झटकला
अन् बाप्पाच्या आगमनाची
आठवण झाली
मी म्हणलं बाप्पा
यावर्षी येताना मनाशी
पक्की खूणगाठ ठेव
जिथे जिथे लावतील डीजे
अन् करतील वेडेवाकडे नाचांचे चाळे
तिथे तिथे तू दाखवशील आपुले रौद्र रुप
जिथे होईल मनोभावे पूजा
करतील खरी तुझी आब राखून आरती
तिथे दे तू भक्तांना खराखुरा औआशिर्वाद
आणखी एक सांगते बाप्पा तुला
नवसाच्या नावावर जे बाजार
मांडतात त्यांना खरचंच
एकदा तरी दाखव रे तुझा इंगा
म्हणजेच होईल या साऱ्या
समूळ नाश
अन् होईल खरा गणेशोत्सव
लोकमान्यांना अभिप्रेत असलेला

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment