Wednesday 26 September 2018

बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
माणुस मात्र असावा,
अगदी जवळचा फक्त....!!
प्रेम करावं कुणावर,
त्याला सीमाच नसावी....
भावनाच इतकी गोडं,
जी अखंड जपावी...!!
रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
फार काळ टिकु नये,
असावा एखादं घटका....!!
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त...!!
कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
झालाचं जर कधी,
चुकून एखादं भांडण...!!
मनाने होऊ नये
कधी दूर
जरी असेल काही सल..!!
होऊन जावे  इतके
एकसंध
की होताच येणार
नाही  कधी विलग..!!
असेच जगावे अलवार
अळवावरच्या पाण्यासारखे
अन् करावा सोहळा
येणाऱ्या क्षणांचा
लुटावा आनंद मनमुराद
जगण्याचा...!!

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment