Friday 5 October 2018

काल whatsapp वर एक पोस्ट वाचनात आली नवरा IT engineer. व  बायको               CA असे दाम्पत्य नवरा अचानक कार accident मधे जातो पण त्याची सारी investment ही एका laptop मधे  गुप्त असते इतकी त्या बायकोला काहीच माहीत नसते. तात्पर्य इतकेच की साऱ्या जुन्या जाणत्या पिढीने याचा सारा दोष हा नवीन technology ला म्हणजेच Internet and online याला देऊन टाकला पण खरं तर हा दोष system चा नसून माणसाच्या       विश्वास र्हतेचा आहे. यावरुनच ही कविता
सुचली

मी तला मी कधी संपतच नाही
मी माझे मला याखेरीज
काही दुसरे सुचतच नाही
मी इतका आत्मकेंद्रित की
आजुबाजूचा समाज
जिवाभावाची माणसे मला
आताशा उमगतच नाहीत
झोपेतून उठून रात्री झोपे पर्यंत
एखाद्या यंत्रवत काम करतो मी
कशासाठी
ऐहिक सुख अन् खूप सारा पैसा
कमविण्यासाठी
अशा मृगजळापाठी धावतो मी
कुणाशी काही share करण्या इतका
वेळच नाही माझ्या शी
अन् मग स्वतःचा ego कुरवाळत
इतरांना तुच्छ लेखत virtual दुनियेत
हरवतो मी
पण अरे वे ड्या अजूनही जागा हो
जिवाभावाच्या माणसांत रम
थोडा पैसा कमी मिळू दे
पण तुझ्या जिवाभावाच्या माणसांच
बक्कळ प्रेम अन् विश्वास मिळव
तिच असेल तुझ्या आयुष्याची खरी पुंजी

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment