Thursday 4 October 2018

मैत्री

आजतागायत मैत्री या विषयावर खूप लेख वाचले. खूप मैत्रीचे किस्सेही ऐकलेत. म्हणूनच वाटले आपणही मैत्री वर चार ओळी लिहाव्यात. खरं तर मैत्री या शब्दातच खूप सामर्थ्य आहे. दोन माणसांची मैत्री ही स्थळ काळ वेळ किंवा लहान मोठं हे बघून होतच नसते ती होते ती फक्त आणि फक्त त्यांच्यातील एखाद्या समान छंदामुळे, स्वभावातील साम्याने किंवा काही वेळा तर आयुष्यात खालेल्या खस्तांनी सुध्दा.
असो आज मला एक प्रसंग आठवतो आहे याच मैत्रीला धरुनच आहे. तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मध्यमवयीन साऱ्या लोकांना new generation मुळे facebook आणि whatsapp चे आकलन झाले होते. तेव्हाच पुण्यातील एका मित्राला facebook वर आपले जुने दोन मित्र सापडले. मग दोन सापडल्या वर त्याच्या group मधील बाकी साऱ्या मित्र मैत्रिणींना तो शोधू लागला.जवळ पास सारे सापडले एक मैत्रीण सोडून त्याला खूपच रुखरुख लागली. परंतु तो हटला नाही त्याने या साऱ्याचा एक whatsapp group करुन पूर्वीसारखे वैशाली त भेटायचा प्रस्ताव ठेवला. आता सारेच आयुष्यात स्थिरावल्यामुळे आणि खूप वर्षांनी भेटण्याची उत्कंठा असल्यामुळे सगळे तयार झाले. भेटले त्या दिवशी सर्वांना आपल्या न सापडलेल्या मैत्रिणीची खूप आठवण येत होती. परंतु शाळा सोडल्यापासून ती कोणाच्याच संर्पकात नसल्यामुळे कोणाला तिचे काही च माहीत नव्हते कारण तिचे लग्न झाले असेल नाव बदले असेल तर facebook वर कसे सापडणार. पण जिथे इच्छा जबर असते ना तिथे मार्ग आपसूक सापडतोच. तसेच काही से झाले त्या groupमधील एका मैत्रिणीला कळले की ती पुण्यात च आहे परंतु आजारी आहे. तिला राहवेच ना तिने पत्ता शोधला अन् थेट तिच्या घरीच पोहोचली. तिचा विश्वास च बसेना शाळेत सगळ्या games मधे हिरीरीने पुढे असणाऱ्या आपल्या मैत्रिणी ला असे अंथरुणाला खिळलेले पाहून. नंतर चौकशी अंती कळले की तिचा accident झाला वर्षभरापूर्वी तेव्हापासून ती अशीच आहे. तिने ठरविले आपल्या मैत्रिणीला आपणच साऱ्या मित्र मैत्रिणींनी मिळून बरे करायचे. तिने साऱ्यांना बोलावून सर्व बघितलेले कथन केले आणि म्हणाली आता आपली मैत्रीण परत पूर्वी सारखी आपल्यात आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला प्रयत्न करून बघूया. आणि रोज एक एक जण जाऊन तिच्याशी तासभर गप्पा मारु लागले हळूहळू ती बरी होऊ लागली. आणि एक दिवस तिच्या मुलाने फोन केला त्या मैत्रिणी ला म्हणाला मावशी आज आई स्वतः होऊन उठून चालू लागली आणि तिने तुम्हा सगळ्यांना घरी बोलावले आहे.
त्याचे शब्द ऐकून त्या मैत्रिणीचा आनंद गगनात मावेना.तिने पटापटा सगळ्यांना फोन केले. सर्वच खूप आनंदाने तिच्याकडे गेले सगळ्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते आपली मैत्रिण माणसात आली याचा कोण आनंद झाला होता सर्वांना. डॉ क्टर सुध्दा म्हणाले हे काही तरी अर्तक्यचं आहे.खरं तर ही सारी जादू मैत्रीची होती.हीच ताकद आहे खऱ्या निखळ स्वच्छ सुंदर मैत्रीची.

मैत्री एक अनोखं बंधन
जिथे नसतो स्वार्थाचा गंध
असतो तो फक्त अतूट संग
मैत्री एक अतूट नातं
जे तप्त उन्हातही असतं
सावलीसमं
वसंतातल्या गुलमोहरासमं
अलवार फुलणारं
अन् सहवासाच्या चांदण्यात
मनमुराद खुलणारं
मैत्री एक अभेद्य साथं
सदैव मदतीचा हात देणारी
अन् संकटांना सोबतीनं
मात देणारी
मैत्री एक असं घरटं
जिथे मिळे वणव्यातही सहारा
अन् दुर्देवातही थारा
मैत्री एक असं औषध
जे डॉ क्टरांशिवाय मिळतं
अन् जे मनाची कायम किळजी घेतं
मैत्रीसारखी दुसरी देणगी नाही
मनाच्या अलगद कोपऱ्यातील

गुपित उघड करायला
मैत्रीखेरीज दुसरं  हक्काचं स्थानचं नाही
म्हणून च म्हणते
मैत्री एक अनमोल ठेवा
हृदयातून जपण्यासारखा
अन् अंतापर्यंत साथ निभावण्यासारखा

  मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment