Friday 5 October 2018

सध्याच्या गतिमान जगात तसे तर कुणालाच कुणाकडे बघायला वेळ नाही. प्रत्येक जण इतका busy असतो की झोपेतून उठून रात्री झोपस्तवर काय कामं करायची याची एक यादी डोक्यात घोळत असते. त्यामुळे अचानक कोणी तरी कसलेतरी आमंत्रण किंवा इतर काही काम सांगितले की मनुष्य गोंधळात पडतो आणि त्याची चिडचिड सुरू होते. त्या वैतागातूनच एक statement बाहेर येऊ लागते मला वेळचं नाही मी किती busy आहे मला माझाच विचार करायला वेळ नाही वगैरे वगैरे.. आमची आजी लहानपणी म्हणायची "अग बायांनो दिवस कधी मोठा होत नसतो आपणच पहाटे उठावं म्हणजे सगळं बेस होत असतं" आजकाल हे आजीचे शब्द सारखेच कानात घुमतात खर तरं आमची आजी आजकालच्या पिढीच्या दृष्टीने बघितलं तर एक गावंढळ अडाणी बाई पण केवढं अचाट जीवनाचं तत्वज्ञान सांगायची.
हे खरचं आहे दिवसाचे तास वाढत नाहीत कधी. त्यामुळे आपलं schedule दिवसात कसं बसवायचं ते आपणचं ठरवलं पाहिजे.
मला वेळ नाही ही सबब सोडून दिली पाहिजे. इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे मला वेळ कसा काढता येईल याचा विचार केला पाहिजे.
काम हे प्रत्येकाला असलेच पाहिजे नाही तर  त्याची परिस्थिती एखाद्या खटारा गाडीसारखी होईल नुसताच ढाचा बिनकामाचा.  काम करत रहाणे हे जिंवतपणाचे लक्षण आहे. हाताला काम हवे च नाहीतर इंग्रजी तल्या empty mind devil's workshop या म्हणीप्रमाणे परिस्थिती होईल.
काम कराच फक्त त्याबरोबरच आपल्या प्रियजनांनाही थोडासा वेळ द्या.कधीतरी एखाद्या रम्य ठिकाणी फिरायला जा बघा कशा तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात ते अन् मग परत कामाला लागा नव्या जोमाने नव्या जोशाने. तेच तेच काम करून monotonous होण्यापेक्षा कामातून थोडासा वेळ काढून स्वतः चे छंद जोपासा जे ठरेल तुमचे खरेखुरे टॉनिक.
सर्वात महत्त्वाचे आयुष्य खूप सुंदर आहे. काम करणाऱ्या व्यक्ती ला कधीच depression येत नाही म्हणून नेहमी कामात रहा. तुमच्यातल्या creative माणसाला सदैव जागे ठेवा म्हणजे तिच ठरेल तुमची खरी ओळख.
हसत रहा. दुनियेला हसवत रहा. पृथ्वीवर मनुष्य प्राणी म्हणून जन्मला आहात याचा अभिमानच बाळगा. अन् देवाचे आभार माना की त्याने एवढ्या creativity ने मनुष्यास जन्माला घातले.

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment