Tuesday 13 November 2018

बालपण

भातुकलीची साथ होती
कागदाची नाव होती
पाण्याने साठलेल्या डबक्याचा
किनारा  होता
मैत्रिणींची संगत होती
खेळण्याची मस्ती होती
मन हे वेडे होते
चिऊ काऊच्या गोष्टीत
रमत होते
कल्पनेच्या दुनियेतच
जगत होते
ना उद्याची चिंता
ना कसली ददात
ना कसली हाव
ना कसला ध्यास
होता तो फक्त
छान निर्व्याज  निर्मळ
भोळा असा तो बाळपणीचा काळ
कुठे आलो आता आपण
या बाजारी अन् समजुतदारीच्या
दुनियेत
बालपण गेले पार हरवून

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment